शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

चुकीचे धरण, चिकोत्रावासीयांचे मरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:51 IST

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज ...

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोºयातील ३५ गावांची जीवनदायिनी म्हणून चिकोत्रा नदी मानली जाते; परंतु या नदीवर बांधण्यात आलेले चिकोत्रा (झुलपेवाडी) धरण पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरतच नाही. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची समस्या पाचवीलाच पुजलेली आहे.धरणाच्या पूर्ततेनंतर चिकोत्रावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी गेलेल्यांना गावाकडची ओढ लागली आणि ते परतलेही. मात्र, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.१९९६ मध्ये चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने झुलपेवाडी (ता. आजरा) येथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.गावाकडे परतलेल्यांना मनस्ताप३५ गावांतील अनेक लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, इचलकरंजी, पुणे कोल्हापूरसह अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये जात होते. २००० साली हे धरण पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. शेतीवाडी करून संसाराचा गाडा हाकायचा या हेतूने अनेकजण परतलेही. मात्र, चिकोत्राचे पाणी म्हणजे मृगजळच ठरल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.पाणी विकतघेण्याची वेळ...धरणातील दर महिन्यातून एकदा सोडण्यात येणारे पाणी नदीच्या उथळपणामुळे लगेचच वाहून जाते. केवळ ४ ते ८दिवसांत नदी कोरडी पडते. यानंतर २० ते २२दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर अनेक गावांत १००० ते ३००० लिटर पाण्याची टाकी ५०० ते ७०० रूपये देऊन विकत घ्यावी लागते. त्यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. शेतीतून उत्पादन नाही. यामुळे चिकोत्रावासीयांत कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहेउपलब्ध पाण्याचेनियोजनही ढिसाळ...धरणामध्ये दरवर्षी उपलब्ध होणाºया ५० ते ६० टक्के पाण्याचे नियोजन करतानाही पाटबंधारे, वीजवितरण अधिकाºयांमध्ये समन्वय नसतो. धरणातून सोडलेले पाणी बेळुंकीपर्यंत पोहोचविण्यासाठी उपसाबंदी लागू असते. मात्र, बहुतांशी पंपधारक जनरेटर, सिंगल फेजचा अवलंब करून पाणी उपसा करतात. परिणामी अनेक गावांत पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त होते. याबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.चिकोत्रा धरणाचा सर्व्हे करताना येथील पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केला. या अधिकाºयांनी शासन व शेतकरी यांची फसवणूकच केली आहे. तरीसुद्धा आज आम्ही पाणलोट क्षेत्रातील काही जलस्रोत बळकट करण्यासंबंधी उपाययोजना सुचविल्या आहेत व त्याकरिता लोकचळवळ उभी करीत आहोत. त्यामुळे शासनाने लोकभावनेचा आदर करून सर्व मागण्या मान्य कराव्यात. - कॉ. संभाजी यादव, किसान सभा अध्यक्ष, कागल तालुका