शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

चुकीचे धरण, चिकोत्रावासीयांचे मरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:51 IST

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज ...

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोºयातील ३५ गावांची जीवनदायिनी म्हणून चिकोत्रा नदी मानली जाते; परंतु या नदीवर बांधण्यात आलेले चिकोत्रा (झुलपेवाडी) धरण पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरतच नाही. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची समस्या पाचवीलाच पुजलेली आहे.धरणाच्या पूर्ततेनंतर चिकोत्रावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी गेलेल्यांना गावाकडची ओढ लागली आणि ते परतलेही. मात्र, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.१९९६ मध्ये चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने झुलपेवाडी (ता. आजरा) येथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.गावाकडे परतलेल्यांना मनस्ताप३५ गावांतील अनेक लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, इचलकरंजी, पुणे कोल्हापूरसह अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये जात होते. २००० साली हे धरण पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. शेतीवाडी करून संसाराचा गाडा हाकायचा या हेतूने अनेकजण परतलेही. मात्र, चिकोत्राचे पाणी म्हणजे मृगजळच ठरल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.पाणी विकतघेण्याची वेळ...धरणातील दर महिन्यातून एकदा सोडण्यात येणारे पाणी नदीच्या उथळपणामुळे लगेचच वाहून जाते. केवळ ४ ते ८दिवसांत नदी कोरडी पडते. यानंतर २० ते २२दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर अनेक गावांत १००० ते ३००० लिटर पाण्याची टाकी ५०० ते ७०० रूपये देऊन विकत घ्यावी लागते. त्यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. शेतीतून उत्पादन नाही. यामुळे चिकोत्रावासीयांत कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहेउपलब्ध पाण्याचेनियोजनही ढिसाळ...धरणामध्ये दरवर्षी उपलब्ध होणाºया ५० ते ६० टक्के पाण्याचे नियोजन करतानाही पाटबंधारे, वीजवितरण अधिकाºयांमध्ये समन्वय नसतो. धरणातून सोडलेले पाणी बेळुंकीपर्यंत पोहोचविण्यासाठी उपसाबंदी लागू असते. मात्र, बहुतांशी पंपधारक जनरेटर, सिंगल फेजचा अवलंब करून पाणी उपसा करतात. परिणामी अनेक गावांत पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त होते. याबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.चिकोत्रा धरणाचा सर्व्हे करताना येथील पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केला. या अधिकाºयांनी शासन व शेतकरी यांची फसवणूकच केली आहे. तरीसुद्धा आज आम्ही पाणलोट क्षेत्रातील काही जलस्रोत बळकट करण्यासंबंधी उपाययोजना सुचविल्या आहेत व त्याकरिता लोकचळवळ उभी करीत आहोत. त्यामुळे शासनाने लोकभावनेचा आदर करून सर्व मागण्या मान्य कराव्यात. - कॉ. संभाजी यादव, किसान सभा अध्यक्ष, कागल तालुका