शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे धरण, चिकोत्रावासीयांचे मरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:51 IST

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज ...

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोºयातील ३५ गावांची जीवनदायिनी म्हणून चिकोत्रा नदी मानली जाते; परंतु या नदीवर बांधण्यात आलेले चिकोत्रा (झुलपेवाडी) धरण पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरतच नाही. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची समस्या पाचवीलाच पुजलेली आहे.धरणाच्या पूर्ततेनंतर चिकोत्रावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी गेलेल्यांना गावाकडची ओढ लागली आणि ते परतलेही. मात्र, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.१९९६ मध्ये चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने झुलपेवाडी (ता. आजरा) येथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.गावाकडे परतलेल्यांना मनस्ताप३५ गावांतील अनेक लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, इचलकरंजी, पुणे कोल्हापूरसह अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये जात होते. २००० साली हे धरण पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. शेतीवाडी करून संसाराचा गाडा हाकायचा या हेतूने अनेकजण परतलेही. मात्र, चिकोत्राचे पाणी म्हणजे मृगजळच ठरल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.पाणी विकतघेण्याची वेळ...धरणातील दर महिन्यातून एकदा सोडण्यात येणारे पाणी नदीच्या उथळपणामुळे लगेचच वाहून जाते. केवळ ४ ते ८दिवसांत नदी कोरडी पडते. यानंतर २० ते २२दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर अनेक गावांत १००० ते ३००० लिटर पाण्याची टाकी ५०० ते ७०० रूपये देऊन विकत घ्यावी लागते. त्यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. शेतीतून उत्पादन नाही. यामुळे चिकोत्रावासीयांत कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहेउपलब्ध पाण्याचेनियोजनही ढिसाळ...धरणामध्ये दरवर्षी उपलब्ध होणाºया ५० ते ६० टक्के पाण्याचे नियोजन करतानाही पाटबंधारे, वीजवितरण अधिकाºयांमध्ये समन्वय नसतो. धरणातून सोडलेले पाणी बेळुंकीपर्यंत पोहोचविण्यासाठी उपसाबंदी लागू असते. मात्र, बहुतांशी पंपधारक जनरेटर, सिंगल फेजचा अवलंब करून पाणी उपसा करतात. परिणामी अनेक गावांत पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त होते. याबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.चिकोत्रा धरणाचा सर्व्हे करताना येथील पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केला. या अधिकाºयांनी शासन व शेतकरी यांची फसवणूकच केली आहे. तरीसुद्धा आज आम्ही पाणलोट क्षेत्रातील काही जलस्रोत बळकट करण्यासंबंधी उपाययोजना सुचविल्या आहेत व त्याकरिता लोकचळवळ उभी करीत आहोत. त्यामुळे शासनाने लोकभावनेचा आदर करून सर्व मागण्या मान्य कराव्यात. - कॉ. संभाजी यादव, किसान सभा अध्यक्ष, कागल तालुका